Oplus_131072
काशिनाथ शिंदे जेजुरी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याने सहा वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असताना तिघा वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. उर्वरित तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, टेम्पो चालकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे आषाढी वारीच्या आनंदावर दुःखाची छाया पसरली असून वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.
