कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसून आंदोलनाची वेळ; प्रशासन कधी जागे होणार?

गांधीनगर-जयप्रकाश नगरमधील अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप; ‘कचरा हटवा, आरोग्य वाचवा’ची हाक

 

काशिनाथ शिंदे

 

 

 

पुणे गांधीनगर आणि जयप्रकाश नगर परिसरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

कचरा नियमित उचलला जात नसल्याने नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

‘तक्रारी करूनही उपयोग नाही, आता कचऱ्यातच बसावे का?’

 

परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना नागरिकांनीच वारंवार पाठपुरावा करायचा, तक्रारी करायच्या आणि त्यानंतरही कचऱ्याचे ढीग तसेच राहणार असतील, तर प्रशासनाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रश्न सुटत नसतील तर प्रशासनाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी आता चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसून आंदोलन करायचे का, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 

हा विरोध कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाविरोधात नसून, नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या मूलभूत प्रश्नासाठी आहे. स्वच्छता ही नागरिकांवर केलेली मेहरबानी नसून त्यांचा मूलभूत नागरी हक्क आहे. त्यामुळे कचरा संकलन आणि परिसराची नियमित स्वच्छता याबाबत प्रशासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 

‘कचरा हटवा… आरोग्य वाचवा!’

 

“कचरा हटवा, नागरिकांचे आरोग्य वाचवा!”, “स्वच्छ परिसर हा आमचा हक्क आहे!” अशा घोषणांसह नागरिकांनी प्रशासनाला आता तरी जागे होण्याचे आवाहन केले आहे. केवळ कचरा उचलून प्रश्न तात्पुरता सोडवण्याऐवजी कचरा पुन्हा साचणार नाही, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.

See also  चार पोलिस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त; सेवागौरव सोहळ्यात भावपूर्ण निरोप

 

गांधीनगर आणि जयप्रकाश नगर परिसरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा आता अंत होत चालला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

 

कचऱ्याचे ढीग दिसत असताना प्रशासनाला ते दिसत नाहीत का? नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न आणखी किती दिवस दुर्लक्षित राहणार? प्रशासनाच्या कारभारावर हा प्रश्नचिन्ह कायम आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!