Oplus_131072
काशिनाथ शिंदे : मुंबई
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या नीट परीक्षा आणि शैक्षणिक सुधारणांच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सामाजिक माध्यमांवर राजीनामा जाहीर केल्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि आंदोलनकर्त्यांकडून त्याचे स्वागत करण्यात आले.
नीट पेपरफुटी प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित आंदोलन होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या लढ्याचा पहिला टप्पा असल्याचे सांगत, शैक्षणिक सुधारणांसाठीचा संघर्ष पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पुढील स्वरूपाबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
नीट परीक्षा, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांवरून देशभरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. या आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात मोठी घडामोड घडल्याचे मानले जात आहे.
