“लातूर पोलिसांचा ‘ऑपरेशन मोबाईल रिकव्हरी’ यशस्वी; ७६ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य!”

काशिनाथ शिंदे: लातूर

हरवलेला मोबाईल परत मिळणे हे अनेक नागरिकांसाठी अशक्यप्राय वाटत असते. मात्र लातूर शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी समन्वयाच्या जोरावर तब्बल ७६ हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तांत्रिक तपास, उपलब्ध माहितीचे विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून विविध पोलीस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याने २५, एमआयडीसी पोलीस ठाण्याने २१, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने १४ आणि गांधी चौक पोलीस ठाण्याने १६, असे एकूण ७६ मोबाईल फोन शोधून काढले.

दि. ३० जुलै २०२६ रोजी लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत लातूर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

लातूर पोलिसांनी ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक संतोष पाटीलपोलीस अंमलदार लक्ष्मण कांदे (शिवाजीनगर), पोलीस निरीक्षक समाधान चवरेपोलीस अंमलदार अक्षय डिगोळे (एमआयडीसी), पोलीस निरीक्षक अरविंद पवारपोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर (विवेकानंद चौक), तसेच पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाडपोलीस अंमलदार योगेश चिंचोलीकर (गांधी चौक) यांनी विशेष परिश्रम घेतले.

See also  काळेवाडीत गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडक छापा; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!