शिक्षणविश्वाचा दीपस्तंभ मालवला! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन

काशिनाथ शिंदे : कोल्हापूर

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिक्षण क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात भरीव योगदान दिले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.

२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी डी. वाय. पाटील ग्रुप’ची स्थापना करून देशभरात १८२ हून अधिक शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय शाळा आणि सात विद्यापीठांचे भव्य शैक्षणिक जाळे उभे केले. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य त्यांच्या संस्थांमधून घडले.

राजकीय क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. महाराष्ट्रात आमदार व मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.

डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज (बंटी) पाटील यांचे वडील होते. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि असंख्य माजी विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“शिक्षणाचा वटवृक्ष हरपला; लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा एक महान शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला,” अशा शब्दांत राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

See also  "मोशी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे आदेश, कचरा व्यवस्थापनावर कठोर निर्देश!"
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!