काशिनाथ शिंदे : पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीत आर्थिक अडचणी आणि नोकरी गेल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने घरामध्ये कोळसा आणि रासायनिक पदार्थ (केमिकल) वापरून विषारी धूर तयार केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर जळालेला कोळसा आणि काही रासायनिक पदार्थ आढळून आले असून, त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे.
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत आर्थिक संकट, वाढते कर्ज आणि रोजगार गमावल्यामुळे जगणे अशक्य झाल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात इतर कोणताही संशयास्पद मुद्दा आहे का, याचाही सर्वंकष तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होण
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी वाढत्या आर्थिक तणावामुळे घडणाऱ्या अशा घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.







