काशिनाथ शिंदे
मुंबई : पवई येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर आणि सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या ‘मन तुझं जलतरंग’ या बहारदार कार्यक्रमाची अविस्मरणीय मैफल रंगली. या कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन डॉ. सुनील धनगर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि उत्स्फूर्त निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
बीएमसीचे सहाय्यक अभियंता भारत केदार यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
समीरा गुजर यांच्या सादरीकरणासोबतच वैभव जोशी यांच्या काव्याची मैफल रंगली. शब्द, भावना आणि काव्य यांचा सुरेख मिलाफ साधणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. सुनील धनगर यांनी आपल्या प्रभावी निवेदनातून कार्यक्रमाची सूत्रे समर्थपणे सांभाळली.
मान्यवरांची उपस्थिती, काव्याची रंगत आणि निवेदनाची प्रभावी शैली यामुळे ‘मन तुझं जलतरंग’ हा कार्यक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. भारत केदार यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने आनंद आणि सांस्कृतिक मेजवानीची अनोखी अनुभूती उपस्थितांना दिली.







